Breaking

Tuesday, May 30, 2017

!! श्रीगोविंदप्रभू/श्रीगुंडमराऊळ महाराज !!

 

महानुभावपंथात श्रीगोविंदप्रभू महाराजांचा अवतार हा कळीयुगात पीता अनंतनायकापासून माता नेमाइसा यांच्या गर्भी काण्व शाखीय ब्राम्हण कुटुंबात जन्मलेला दवडन्याच्या प्रकारातला अवतारहोय. महानुभाव पंथियांच्या मताप्रमाणे हा परमेश्वरावतार असुन आछादनीचा परदृश्यावतार होय.


 श्रीचक्रपाणी महाराजांपासून द्वारावती येथे उभयशक्तींचा स्विकार करुन यांनी आपल्या अवतार कार्यास सुरुवात केली. शक्तींस्विकारानंतर त्यांनी रुद्धपूर प्रयाण केले व त्यानंतर आपल्या दैनंदीन आयुष्याची ८८वर्षे त्यांनी समता व सामाजीक क्रांतीचा कृतीपर संदेश देन्याचे कार्य अखंड सुरु ठेवले.


श्रीगुंडमराऊळ महाराजांच्या अवताराबाबत जी काही माहीति मीळते ती रुद्धपूरचरीत्रात आलेल्या लीळांमधुन. या सर्वच लीळांचे संकलन पं.म्हाइंभट्ट यांनी केलेले आहे. महानुभावीय मताप्रमाणे हा आछादनीचा परदृश्यावतार असल्यामूळे तो जीवोद्धारक नाही असा समज कुणी करू नये, कारण हा अवतार सुद्धा जीवोद्धारकच आहे. कारण अन्वयकार आपल्या 'नामाचे दहा ठाये' या प्रकरणात 'गुंड' या शब्दाचा अर्थ वीषद करताना म्हणतात 'गुंड हा धातु वेष्टनी वर्तेः आपुलेनी ब्रम्हत्व धर्मे जनातें 
आकर्षोनिः जनाचे प्रतिकुळत्व गुंडौनिः योग्या जीवा अर्ध कैवल्य देतिः लीळावशे 



संपुर्णही देतिः म्हणौनि श्रीगुंडमराऊळः' इतर अवताराप्रमाणेच या अवताराचे सुद्धा वीषेशत्व आगळे-वेगळेच आहे.
श्रीगुंडमराऊळ महाराज नगरात निर्वीकल्प क्रीडा करीत. जो काळ(८००वर्षां पूर्वीचा) संपूर्ण विषमता, भेदाभेद व अस्पृश्यता मानण्याचा होता त्याच काळात श्रीगुंडमराऊळ महाराज शुद्र, महार, मांगाच्या घरी आरोगणा करीत. हे उदाहरण पहा- एका तेलीनिच्या मुलाच्या हातची भाकर ते हीसकाउन खाऊ लागले तेव्हा ती तेलीन म्हणते 'राउळो ते भाकर तेलीयाचीः' यावर स्वामी म्हणतात 'आवो मेली जायः भाकर तेलीयाची नव्हे म्हणेः लाखाची म्हणेः'(लाखोरी नावाचे धान्य). अश्या प्रकारे राऊळ महार-मांगाच्या घरी तसेच दीक्षित-उपास्नीयांच्या घरी जातात व भ्रष्टाभ्रष्ट करतात म्हणुन महाजनांनी काय केले त्याचे बोलके वर्णन सांगनारे या लीळेतील शब्द पाहा- ते वर्तन देखोनी महाजनाते खंती उपजलीः महाजनी म्हणितलेः 'राऊळ मातांगा महाराच्या घरोघरी वीचरतिः ऐसे राऊळी भ्रष्टाभ्रष्ट केलेः तरी अंत्यजेची गावाहूनि दवडावीः का गावाबाहिरी घालावीः' त्यांनी तसे केलेही परंतू श्रीगुंडमराऊळ महाराज तेथेही जातच राहीले. एवढेच नाही तर तत्कालीन सामाजीक बंधने झुगारुन ते घरोघरी जात. घरी कोणी नसेल तर त्या बाईचे मुल सांभाळने, कोणाचे मुसळ धरने, कोणास जेऊ वाढने, कोणा नीराधार स्त्रीचे बाळंतपण करने, तीला जेऊ वाढने, इत्यादी मुळे रुद्धपूर परसरातील सामान्य लोक त्यांना "राऊळ मायः राऊळ बापः" म्हणत असत.

श्रीगुंडमराऊळ महाराजांबाबत उपरोक्त सर्व बाबींचा आपण विचार केल्यास आपल्या हे लक्षात येइल की, एका उच्च्वर्णीय काण्व शाखीय ब्राम्हण कुळात जन्मलेला व वेदशास्त्र संपन्न, त्या काळात, म्हणजेच संतज्ञानेश्वरांच्याही एक शतक आधी होउन गेलेला पुरूष, शुद्र, महार, मांगाच्या घरी आरोगणा करतो, आपल्या आयुष्याची दैनंदीन ८८वर्षे संपूर्ण विषमता, भेदाभेद व अस्पृश्यता मानण्याच्या काळात, तत्कालीन सामाजीक बंधने झुगारुन महार, मांगाच्या घरोघरी जातो.

विषमता, भेदाभेद व अस्पृश्यता ८००वर्षां पूर्वी दूर करण्याचा प्रयत्न करणार्या अश्या या पुरूषा बाबत समाजाने किंचीतही दखल घेतलेली दीसत नाही. त्या काळातला असा "सामाजीक क्रांतीच्या मूळस्त्रोत", अशी श्रीगुंडमराऊळ महाराजांबाबत सुद्धा दखल कीमान यापूढे तरी घेतल्या जावी किंवा असा कोणी प्रयत्न तरी करावा.

No comments:

Post a Comment