महानुभावपंथात श्रीचक्रधरस्वामी अवतार हा कळीयुगात गुजराथेतील विशालदेव नावाच्या प्रधानाचा पूत्र हरीपाळदेव याचे पतीत(मृतदेह) स्विकारुन झालेला अवतार होय. महानुभाव पंथियांच्या मताप्रमाणे हा परमेश्वरावतार असुन संपूर्ण उभयदृश्यावतार होय.
श्रीगुंडमराऊळ महाराजांपासून रुद्धपूर येथे उभयशक्तींचा स्विकार करुन यांनी आपल्या अवतार कार्यास सुरुवात केली. शक्तींस्विकारानंतर त्यांनी वैराग्य धारन केले व त्यानंतर काहीच वर्षात त्यांनी महराष्ट्रात परत येउन व पूढे येथेच राहुन ज्ञानदानाचे, व सामाजीक वीषमता दूर दरण्याचे कार्य अखंड सुरु ठेवले.
श्रीगुंडमराऊळ महाराजांपासून रुद्धपूर येथे उभयशक्तींचा स्विकार करुन यांनी आपल्या अवतार कार्यास सुरुवात केली. शक्तींस्विकारानंतर त्यांनी वैराग्य धारन केले व त्यानंतर काहीच वर्षात त्यांनी महराष्ट्रात परत येउन व पूढे येथेच राहुन ज्ञानदानाचे, व सामाजीक वीषमता दूर दरण्याचे कार्य अखंड सुरु ठेवले.
श्रीचक्रधरस्वामींचा इ.स.१२०० हा कालखंड महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड होता. समाजात चातुर्वर्ण्यांची मिरासदारी वाढलेली होती. धर्ममार्तंडांची भाषा संस्कृत तर जनसामान्यांची भाषा मराठी होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेच्या कडीकुलपात बंद होते.
अश्या काळात संस्कृतभाषेतून तत्त्वज्ञानाचा पुरस्कार न करता श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या भक्तीजनांना धर्माचे रहस्यमय तत्त्वज्ञान मराठी जनभाषेत सांगुन तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया रचला. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे च्यार अनादीसिद्ध व नित्य पदार्थ आहेत याबाबतची मते सिद्ध करतांना त्यांनी परंपरागत चालत आलेली वाङ्मयीन पद्धती न वापरता स्वतःची आगळी वेगळी व सोपी पद्धती धर्माचे रहस्यमय तत्त्वज्ञान सांगन्यासाठी वापरली. श्रीचक्रधरस्वामी निरुपीत 'श्रृती वचने' ही मराठी जनभाषेत असल्यामुळे, व ती समजन्यास सोपी वाटत असल्यामुळे श्रीचक्रधरस्वामींना लवकरच प्रसिद्धी मीळाली व धर्माचे तत्त्वज्ञानाकरीता लोकभाषेचा पुरस्कार केल्यामुळे सामान्य लोकच नाही तर पं.म्हाइंभट्ट व असे अनेक पंडीत स्वामींकडे आकर्षीत झाले. श्रीचक्रधरस्वामींनी धर्माचे रहस्यमय तत्त्वज्ञान आपल्या मराठी जनभाषेत सांगुन मराठी भाषेला देववानीचा दर्जा दीला. श्रीचक्रधरस्वामींनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक व सामाजीक कार्य होते. पूढेही स्वामींचा हा दृष्टिकोण पंथाचे आद्यआचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञाला 'तुझा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मर्हाटी : तियाचि पुसा' असे उत्तर देउन त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली. श्रीचक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत शिकलेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृतप्रचुर वाङ्मयाच्या वळणावर झाली व संस्कृत भाषेवर त्यांच्या मोठा ताबा असल्याने या सर्वच ग्रंथरचना अत्यंत प्रभावशाली झाल्यात.
अश्या काळात संस्कृतभाषेतून तत्त्वज्ञानाचा पुरस्कार न करता श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या भक्तीजनांना धर्माचे रहस्यमय तत्त्वज्ञान मराठी जनभाषेत सांगुन तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया रचला. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे च्यार अनादीसिद्ध व नित्य पदार्थ आहेत याबाबतची मते सिद्ध करतांना त्यांनी परंपरागत चालत आलेली वाङ्मयीन पद्धती न वापरता स्वतःची आगळी वेगळी व सोपी पद्धती धर्माचे रहस्यमय तत्त्वज्ञान सांगन्यासाठी वापरली. श्रीचक्रधरस्वामी निरुपीत 'श्रृती वचने' ही मराठी जनभाषेत असल्यामुळे, व ती समजन्यास सोपी वाटत असल्यामुळे श्रीचक्रधरस्वामींना लवकरच प्रसिद्धी मीळाली व धर्माचे तत्त्वज्ञानाकरीता लोकभाषेचा पुरस्कार केल्यामुळे सामान्य लोकच नाही तर पं.म्हाइंभट्ट व असे अनेक पंडीत स्वामींकडे आकर्षीत झाले. श्रीचक्रधरस्वामींनी धर्माचे रहस्यमय तत्त्वज्ञान आपल्या मराठी जनभाषेत सांगुन मराठी भाषेला देववानीचा दर्जा दीला. श्रीचक्रधरस्वामींनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक व सामाजीक कार्य होते. पूढेही स्वामींचा हा दृष्टिकोण पंथाचे आद्यआचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञाला 'तुझा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मर्हाटी : तियाचि पुसा' असे उत्तर देउन त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली. श्रीचक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत शिकलेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृतप्रचुर वाङ्मयाच्या वळणावर झाली व संस्कृत भाषेवर त्यांच्या मोठा ताबा असल्याने या सर्वच ग्रंथरचना अत्यंत प्रभावशाली झाल्यात.
इ.स.च्या १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. म्हणुन श्रीचक्रधरस्वामी हे सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक, व बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक होत. कारण श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची कडीकुलपात बंद असलेली दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. श्रीचक्रधरांची धर्मक्रांती ही तत्कालीन सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते. त्यामुळेच श्रीचक्रधरस्वामीं यांना "सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक" हा पहिला बहुमान दील्यास वावगे ठरु नये.
No comments:
Post a Comment