
गोसावी बीजें केलेयांउपरि भटोबास वीरहें नीगोेन गेले: अवस्था प्रकटलीया ते कव्ह नाहीं चोजवती ना: मग माहादाइसें शोधीति शोधीति गंगातीरीहूनि परमेश्वरपूरा गेली: श्रीप्रभुगोसावीयांसी दर्शन जालें: मग दुख करूनि पुसीले: जी जी: श्रीचक्रधरें सांडीलें आणि नागदेवही दीसेना जी: गोसावी वीनती स्वीकरीली: श्रीप्रभुगोसावी म्हणितलें: अवो मेली भानखेडीयासि जाय म्हणेः आणि माहादाइसीं म्हणितलें: जी जी: आणि तैसीची नीगालीं: श्रीचरणीं लागलीं: भानखेडयासीं गेलीं: तवं काहीं देखति ना: मग राणे डोंगर शोधीति गोपाळातें पुसीलें: तेहीं सांघीतलें: होय देखिला होता: आम्ही तयाचां तोंडी कुरंधनें पीळूं: मग माहादाइसीं सोधुनि काढीले: सावधु केले: ओळिंबे झाडीले: पांगुरवीले: पाटकुळीए वाउनी गावांजवळी आनीले: मग एकी ठाइ बैसउनी आपण गावांतु गेलीं: दूध आणिलें: बोळेवरि पाजीले: येतुलेेनी मागीलापसी सावध जाले: ।।2।।
सदर स्मृती बाबत जास्त विवेचन नको. श्रीचक्रधरांचें प्रयाण झाल्या नंतर भटोबासांना जें प्राणांतिक दुःख झालें त्याचें वर्णन केलें आहे. भटोबास वेडेपिसे झाले, आणि सर्वांना सोडुन निघून गेलें, त्यांना शोधीत शोधीत महदंबा परमेश्वरपूर अथवा ऋद्धपूर येथे आली. भटोबासांसाठी तिनें असे अपार कश्ट घेतले नसते तर कदाचित नागदेवाचार्य आपणांस दिसलेही नसते.
No comments:
Post a Comment