एक दिवशी भटोबास आणि नाथोबा भिक्षा करून आले.नदीवर जाऊन जेवले .जेवताक्षणी जोरात थंडी वाजू लागली .कापत कापत दातावर दात आपटत स्वामीपाशी आले.जी .जी .थंडी जोराची वाजतेय जी .हे काय ! एवढी थंडी ? दातावर दात आपटण्या एवढी ? स्वामीनी इतर भक्ति जनांना त्यांची वस्त्रे हिरागाया सांगितले.आणि नेऊन सोडा दोघांनाही त्या उंच टेकडीवर .
पाहू किती थंडी वाजते ते.सर्व भक्तजन मिळून त्यांची पांघरूण खेचू लागली .दोघांना नेऊन उंच टेकडीवर सोडले. थोडा वेळ थांबले आणि अंगाला जाळ सुटला. अंग करपतय की काय असं होऊ लागंल. अंग उष्णतेने असह्य झाल्यावर ओरडू लागले. जी .जी .जाळ सुटला जी .जाळ सुटला जी .पुरे करिजो जी पुरे करिजो जी .असह्य जाळ सुटला जी .आणि अंगाची लाही लाही होतं लागताच ओरडूं लागले.विचित्र नाचूं लागले.थोडावेळ दु:ख भोगलं. मग स्वामिनी बोलावलं,दोघे आले श्रीचरणी मस्तक ठेवून दंडवत घातले.स्वामीनी विचारले काय गा थंडी गेली ? थंडी गेली जी .पण असह्य जाळ सुटला जी .स्वामी म्हणाले जा नदीतून पोहून या ? दोघे नदीवर गेले .पाण्यात उतरले .पोहतात तसातसा अंगावरचा बाह्य जाळ निघाला पण अंतर जाळ तसाच राहिला. स्वामीपाशी आले.जी जी.बाह्य जाळ निघालि पण अंतरजाळ तसाच जी .मग स्वामीनी स्वहस्ते कळशीतले पाणी पाजले.तेव्हा त्यांचा अंतरदाह निर्वतला .
स्वामी म्हणाले,ऐसे आहाचपण न कीजे कीं गा ! वानरेया तुम्ही सर्व महात्मे कीं गा.मुक्तीची चाड आहे ना ? अशा महात्म्यानी उतावळेपणा करूं नये;आपल्याला होत असलेल्या त्रासाचे किंवा सुखसमाधानाचे अतिप्रदर्शन करू नये.
सारांश:--भटोबासांना त्या जाळाचा काही अंश देहपडेपर्यत होता.हिवाळ्यात एका पातळ वस्त्रावर राहायचे.उन्हाळ्यात सर्वागी चंदन लावायचे.
ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण
स्वामी म्हणाले,ऐसे आहाचपण न कीजे कीं गा ! वानरेया तुम्ही सर्व महात्मे कीं गा.मुक्तीची चाड आहे ना ? अशा महात्म्यानी उतावळेपणा करूं नये;आपल्याला होत असलेल्या त्रासाचे किंवा सुखसमाधानाचे अतिप्रदर्शन करू नये.
सारांश:--भटोबासांना त्या जाळाचा काही अंश देहपडेपर्यत होता.हिवाळ्यात एका पातळ वस्त्रावर राहायचे.उन्हाळ्यात सर्वागी चंदन लावायचे.
ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण
No comments:
Post a Comment